ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 18 - अयोध्येत रामायण संग्रहालय बांधण्यासाठी केंद्र सरकार
आणि उत्तरप्रदेश सरकारने स्वतंत्र प्रस्ताव ठेवले आहेत. मात्र भाजपा खासदार
विनय कटियार यांनी रामायण संग्रहालय प्रस्ताव हा फक्त लॉलिपॉप असल्याची
टीका करत पक्षाला घरचा अहेर दिला आहे. 'राम मंदिर बांधण्यासाठी प्रामाणिक
प्रयत्न होण गरजेचं आहे. संग्रहालयाच्या नावाने कुणीही आमच्या हाती लॉलीपॉप
देऊ नये,' असं विनय कटियार बोलले आहेत.
'आम्हाला फक्त राम मंदिर हवं आहे, दुसरं काहीही नाही' असं बोलताना
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्याने या मुद्यावर बोलत नसल्याचंही
त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीदरम्यान विकास आमचा मुख्य अजेंडा असणार आहे
या केंद्राच्या भुमिकेवर विचारलं असता 'विकास गरजेचा आहे, पण राम मंदिर
झालंच पाहिजे,' असं विनय कटियार यांनी म्हटलं आहे.

Post a Comment